‘हिंदु राष्ट्र’ हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व या सर्वांनी युक्त असेल

ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वनिष्ठांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ

ठाणे : हलाल जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद यांच्या माध्यमातून भारतात २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे कारस्थान इस्लामिक संघटनांकडून चालू आहे. धर्मनिरपेक्षतेचे विष आपल्याकडे पेरले जात आहे, ते आपल्याला संघटितपणे हाणून पाडायचे आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकच उपाय आहे. वर्ष २०२५ पर्यंत संताच्या संकल्पाने आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आपण सर्वजण हिंदु राष्ट्राची पहाट पाहणार आहोत. जोपर्यंत हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही तोपर्यंत कुठलाही मावळा शांत बसणार नाही. संविधानात जर १२५ वेळा पालट आणि सुधारणा झाली आहे, तर संविधानिक पद्धतीने हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणे हा आमचा अधिकार आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हे केवळ भौगोलिक प्रदेश नव्हे; तर संस्कृती, परंपरा, भाषा,आचार आणि हिंदुत्व या सर्वांनी युक्त असलेले राष्ट्र असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट*यांनी केले ते ठाणे (प.) येथील नौपाडा भागात असलेल्या शिवस्मृती मित्र मंडळाच्या मैदानात १४ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या डॉ. दीक्षा पेंडभाजे यांनी सुद्धा उपस्थितांना संबोधित केले.
या सभेचा प्रारंभ शंखनाद, वेदमंत्रपठण आणि वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर करण्यात आला. यावेळी सुनील घनवट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक अनुराधा वाडेकर आणि ठाणे येथील संत पू. राजकुमार केतकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. वक्त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली. यानंतर ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘वन्दे मातरम्’ आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला.
लव्ह जिहाद’ विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करा !
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची शपथ घेतली नसती, तर सर्वच हिंदू महिलांना बुरखा घालावा लागला असता. भविष्यातील ती वेळ पुढे येऊ नये यासाठीच हिंदू स्त्रियांनी आत्मरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. हिंदु धर्म संपविण्याचे षडयंत्र लव्ह जिहादच्या माध्यमातून रचले जात आहे, त्यासाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करा

 7,511 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.