मुंबई टोल मुक्तीला ठाकरे सरकारचा नकार

बारामतीला न्याय आणि ठाण्यावर अन्याय…आमदार संजय केळकर यांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

ठाणे : मुंबई प्रवेशद्वार हा हलक्या वाहनांना टोल मुक्त करा, जास्त आर्थिक परतावा करावा लागत असेल तर ०४ क्रमांकाच्या वाहनांना पहिल्या टप्प्यात टोल मुक्त करा, या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, तसेच हिवाळी अधिवेशनात ही हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याचे लेखी उत्तर ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या सहीने ९ महिन्यांनी मिळाले असून त्यात टोल मुक्तीला स्पष्ट पणे नकार दिला आहे. 
आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून “बारामतीला एक न्याय तर ठाण्यावर अन्याय” असं का..? असा संतप्त सवाल आ. केळकर यांनाही ठाकरे सरकारला विचारून उपस्थित केला आहे. 
बारामतीला काही कोटींचा परतावा देऊन टोल मुक्त केले आहे, हे कसे…? ज्या ठाण्यातील नेत्यांनी टोल मुक्तीसाठी आंदोलन केले, तेच आता टोल मुक्तीला नकार देत आहेत हे ही ठाणेकरांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून आमचा ०४ टोल मुक्तीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे ही आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.

 533 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.