१० ऑगस्टपर्यत वाढविली मुदत
मुंबई : कोरोनामुळे राज्यात रखडलेल्या शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ राज्य सरकारने दिली असून या कालावधीत एकूण आस्थापनेच्या फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करता येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी या रखडलेल्या बदल्यांची पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु या दिवसात प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याने यास आणखी १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांने दिली.
644 total views, 1 views today