ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा सुधारित आणि २०२०-२१ चा मूळ अर्थ संकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर


२०२०-२१ चा मूळ अर्थ संकल्प १२४ कोटी ५९ लाख ५२ हजार ६००

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ चा १२४ कोटी ५९ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती सुभाष पवार यांनी सादर केला.

अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या उपस्थित हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या निरनिराळ्या विभागांकडील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज झालेली सर्वसाधारण सभा हि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सन्मानीय सभापती, जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागाचे विभाग प्रमुख सर्वसाधारण सभेस ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी होणारी अर्थसंकल्पीय सभा घेणे शक्य नसल्याने शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता देऊन पुढील जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदर अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार २७ मार्च २०२० रोजी शासन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सन २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ च्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. त्यामुळे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोव्हीड संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करत ही सर्वसाधारण घेण्यात आली.मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, सभेचे पदसिद्ध सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.

या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन, शिक्षण, बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषि, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बाल विकास, ग्रामपंचायत, अपंग कल्याण आदी विभागांना विविध योजनासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. तथापि, देखभाल दुरुस्तीसाठी अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध होतो, हे विचारात घेऊन देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात स्वतंत्ररित्या भरीव तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून पाणीपुरवठ्याच्या नादुरुस्त किंवा बंद योजना सुरू करून ग्रामीण भागात सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होईल.

सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश

आरोग्य विभाग – प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक नेमणे आणि सफाई कामगार नेमणे

पशुसंवर्धन विभाग – ५० टक्के अनुदानावर शेळी वाटप जिल्ह्यातील उत्कृष्ट पशुपालकांचा गौरव करणे, ५० टक्के अनुदानावर संकरित गायीं /म्हैस वाटप, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे,

कृषि विभाग – १)शेतकऱ्यांना पिक संरक्षणाकरीता काटेरी तार, /विद्युत कुंपनासाठी अर्थ सहाय्य करणे प्र. एकर रु. दहा हजार किंवा प्रत्येक्ष खर्चाच्या ७५ टक्के कमी असेल ( प्रती एकर लाभार्थी २ एकर क्षेत्र मर्यादित हेक्टरी)

२)शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढीसाठी फुलशेती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान प्रती १० गुंठे रु. १० हजार देणे ( प्रती लाभार्थी २० गुंठे इतक्या मर्यादित )

समाजकल्याण विभाग – मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरामध्ये सतरंजी पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थाना mscit संगणक/टंकलेखन प्रशिक्षण पूर्ण केल्यावर फी प्रतिपूर्ती करणे

पाणीपुरवठा विभाग – नवीन विंधन विहीर खोदाई, हात पंप उभारणी व कट्टे बांधणे

 579 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.