जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी निभावली होती महत्त्वाची भूमिका

मुंबई : महाराष्ट्राच्या पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज (१६ जून) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चळवळीतून पत्रकारितेत आलेल्या दिनू रणदिवे यांनी पत्रकारितेत लोकशाहीचे मूल्यं रुजवली.

गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. आचार्य अत्रेंसमवेत त्यांनी त्यावेळी तुरुंगवासही भोगला होता. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली.   डहाणूतील आदिवासी बहुल भागात त्यांचा जन्म झाला. मराठी माणसांच्या संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती हेच त्यांच्या पत्रकारितेतील पदार्पणाचे कारण ठरले. ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’चे रणशिंग त्यांनी दिवंगत ज्येष्ठ संपादक अशोक पडबिद्री यांच्या समवेत फुंकले होते. त्या आंदोलनाला लोकचळवळ करण्यात मोलाची भुमिका पत्रिकेने बजावली होती  सामान्य माणसांचे प्रश्न, दलित, वंचितांच्या वेदनांना त्यांनी कायम  वाचा फोडली.
रणदिवेंनी बांगला देश मुक्ती युद्धाचे वार्तांकन प्रत्यक्ष रणभूमीतून केले होते. ही वृत्त मालिका प्रचंड गाजली होती.   २०१८ चा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

शोषितांसाठी आवाज उठवणारी पत्रकारिता त्यांनी केली. ते महाराष्ट्राच्या जडणघडणीचे साक्षीदार नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी दिली.

दिनू रणदिवे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये पत्रकारिता केली. १९८५ साली ते तेथून निवृत्त झाले होते. गेल्याच महिन्यात त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे निधन झाले होते. त्यानंतर एकटेपणाची भावना रणदिवेंना सतावत होती. गेले काही दिवस त्यांनी अन्न त्यागही केल्याचे निकटवर्तीय सांगतात.

 319 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.