लॉकडाऊन संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही – उध्दव ठाकरे

स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक

राज्यात परत लॉकडाऊन लावून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन  लागू करून काही सर्व दुकाने बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर येत आहेत.  मात्र अशा प्रकारचा कुठलाही  निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत गोंधळ निर्माण करतात त्यामुळे खात्री केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या  पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे.

राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत  शिथिल केल्याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीचअंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

 430 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.