त्या घटनेने पवार व्यथित, म्हणाले भरारी पथक नेमा


केंद्र व राज्याने एकत्रित येवून हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन

मुंबई : औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी होतीच शिवाय कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने मनाला यातना झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं अशी सूचना त्यांनी केली.
राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी अशी मागणी करतानाच केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी त्यांनी केली.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.