बदलापूरातील १५० नेपाळी कुटुंबियांना शिवसेनेचा आधार

नेपाळी महासंघाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद

बदलापूर : कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यातील संचार बंदीमुळे अडकुन पडलेल्या बदलापूरातील नेपाळी कुटुंबियांना घरी जाता येत नसल्याने त्यांना मदत करावी असे आवाहन नेपाळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला बदलापूरातील शिवसेनेने तात्काळ प्रतिसाद दिला आहे. बदलापूर मधील सुमारे १५० नेपाळी कुटुंबाला आधार देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. या दीडशे नेपाळी कुटुंबाला दुपारच्या जेवणाची आणि महिनाभर पुरेल येवढे धान्य देण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात कामानिमित्त आलेल्या शेकडो नेपाळी कुटुंब हे उपासमारीचे बळी पडण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकेल्या नेपाळी कुटुबियांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र नेपाळी महासंघ देखील संचार बंदी मुळे सर्व ठिकाणी मदत देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या त्या शहरातील दानशुर व्यक्तींनी नेपाळी कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
बदलापूर शहरात देखील १५० नेपाळी कुटुंब असुन त्यातील २० कुटुंबियांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी या २० कुटुबियांसोबतच बदलापूरात कामानिमित्त आलेल्या इतर १३० कुटुंबाना देखील दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी महिनाभर पुरेल इतके धान्य वाटप केले आहे. तसेच त्यांना लॉकडाऊन संपल्यावर त्यांच्या गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यांच्या गावी जाण्यासाठी देखील मदतीचा हात दिला आहे. बलापूर शहरातील १५० कुटुंबियांना मदत करुन शिवसेनेने नेपाळी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी तात्काळ मदत दिल्याने नेपाळी महासंघातर्फे शिवसेनेचे आभार मानले आहेत.

 571 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.