जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
नवी मुंबई : ‘२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला आणि साहेब खुर्चीवरुन पडले. ब्रीच कॅण्डिला उपचार सुरु होते आणि हेच नाईक ‘मी काही आता बोलत नाही, पवार साहेबांना सर्व माहिती’, असं बोलतात. “अरे जे बाळासाहेबांचे झाले नाही, ते काय पवारांचे होणार,’ असं गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड अँबेसेडर असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीकेची झोड उठवली.
दरम्यान, ‘कोण होते गणेश नाईक, हे विश्वास ठेवून आम्ही बघितले. मी पाच वर्षांपूर्वी बोललो होतो हे जाणार. दादाच्या मनात किती पाप होते, हे आम्हाला माहिती आहे. ते ठाण्यामध्येही नगरसेवकांचे कान चावत होते. पण, ठाणे महापालिका आम्ही शाबूत ठेवली,’ असं आव्हाड म्हणाले.
422 total views, 1 views today