लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि धर्मांतर विरोधात २२ जानेवारीला घाटकोपर येथे हजारो हिंदू रस्त्यावर उतरणार

देशातील ११ राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची आंदोलकांची मागणी

ठाणे : मुंबईसह देशभरात सुरू असलेल्या लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे लागू करावेत या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आयोजित ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त घाटकोपर येथे हजारो हिंदू रस्त्यावर उतरणार आहेत. रविवार, २२ जानेवारी या दिवशी दुपारी ४.३० वाजता सर्वोदय हॉस्पिटल चौक, एल. बी. एस. मार्ग, घाटकोपर (प.) येथून हा ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार असून या मोर्च्याचे रूपांतर शेवटी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, विक्रोळी येथे सभेत होईल. या मोर्च्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी दिली. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते या वेळी घाटकोपर येथील भारत सोसायटी रहिवासी संघाचे अध्यक्ष तानाजी हांडे, यांच्यासोबत येथील रहिवाशी रवींद्र नलावडे, सीमा वाईकर आणि सविता गलांडे उपस्थित होते.
डॉ. धुरी म्हणाले,’पालघर जिल्ह्यातील वसई येथील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची लव्ह-जिहादी आफताबने तिचे ३५ तुकडे करुन निघृण हत्या केली. मुंबईतील टिळकनगर येथील रुपाली चंदनशिवे, धारावी येथील यथोधरा खटिक, कोरपखैरणे येथील उर्वशी वैष्णव, मुंबईतील अभिनेत्री तनुषी शर्मा यांसारख्या अनेक तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या असून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना या पूर्वीही घडल्या आहेत. जनतेमध्येही ‘लव्ह जिहाद’ विषयी रोष आता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात आज २० हजार ६३० मुली आणि महिला गायब असण्याची धक्कादायक स्थिती आहे. देशातील ११ राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची आम्ही मागणी करत आहोत.
लॅण्ड जिहाद प्रकरणात लढ़ा देणारे घाटकोपर येथील रहिवाशी रवींद्र नलावड़े म्हणाले की,’असल्फा व्हिलेज, घाटकोपर (प) मधील भारत सोसायटी रहिवाशी संघ येथे अनधिकृत मदरशा बांधण्यात आला आहे. आम्ही स्थानिक नागरिकांनी या विरोधात मागील आठवड्यात भव्य मोर्चा काढला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम तोडावे, अशी आमची मागणी आहे. ”मालाड येथील मालवणी भागात अनाधिकृत मशिदी उभारण्यासह धर्मांधांचा दबाव, छळ, मारहाण, युवतींची छेडछाड यामुळे तेथील शेकडो हिंदु परिवारांनी गेल्या १० वर्षांत पलायन केले आहे. देशात अनेक ठिकाणी हिंदूंना जबरदस्तीने पलायन करण्यास भाग पाडले जात आहे, तसेच ‘वक्फ बोर्ड’सुद्धा सरकारी व खाजगी जमीन हडप करत आहे. हा काळा कायदा सुद्धा रद्द करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर अनाधिकृत बांधकामे झाली असून ही बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त केले पाहिजे. देशात छळ, बळ, कपट यांद्वारे हिंदूंचे वाढते धर्मांतर रोखले जावे यासाठी धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी आम्ही या मोर्च्यामध्ये करणार आहोत’, असे डॉ. उदय धुरी शेवटी म्हणाले.
हिंदु जनसंघर्ष मोर्च्यामध्ये काही प्रमुख गर्दीच्या ठिकाणी ‘या मोर्च्यात मी सहभागी होत आहे, तुम्हीही सहभागी व्हा !’ असे आवाहन करणारे ‘सेल्फी पॉईन्ट’ उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात येणार आहे. या मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने ‘हिंदूंनो आज नाही, तर कधीच नाही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्याचा निर्धार केला आहे. याविषयी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून प्रसार सुरु आहे. या मोर्च्याचा प्रसार आता अंतिम टप्प्यात आला असून हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी 8080208958 या क्रमांकावर अवश्य संपर्क करावा. असे आवाहन हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

 3,396 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.