मराठी क्रीडा पत्रकार संघातर्फे शनिवार, १ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राला पहिला भारत श्री ‘किताब जिंकून देणाऱ्या विजू पेणकर यांच्या जिद्दीला मिळणार उजाळा
मुंबई : महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवातील पितामह म्हणून ओळखले जाणारे विजू पेणकर यांनी महाराष्ट्रासाठी जिंकलेल्या पहिल्या वहिल्या ‘भारत श्री’ किताबाला येत्या १ ऑक्टोबर रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने मराठी क्रीडा पत्रकार संघातर्फे विशेष कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
माझगाव येथील सर एली कदुरी शाळेत येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे महासचिव चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे विक्रम रोठे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेश सावंत, मराठी क्रीडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष हरचेकर, खजिनदार मंगेश वरवडेकर उपस्थित रहाणार आहेत.
महाराष्ट्रासाठीचा हा पहिला “भारत श्री” किताब जिंकून देणाऱ्या विजू पेणकर यांच्या जिद्दीला यावेळी उजाळा देण्यात येणार आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अश्विन बापट हे विजू पेणकर यांची यावेळी प्रगट मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्यास क्रीडा संघटक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येन उपस्थित रहावे असे आवाहन मराठी क्रीडा पत्रकार संघाचे सचिव संदीप चव्हाण यांनी केले आहे.
188 total views, 1 views today