रिपाइंच्या कामगार आघाडीचा २२ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा

कामगार आघाडीच्या वतीने कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना देणार कामगारांच्या विविध मागण्याचे निवेदन
ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कामगार आघाडीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे कामगारांचा आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रिपाइंच्या कामगार आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोकभाऊ कांबळे यांनी दिली.
कामगारांच्या विविध प्रश्न विविध मागण्यासाठी कामगार आघाडीच्या वतीने कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना कामगारांच्या विविध मागण्याचे एक विशेष शिष्टमंडळ भेटणार आहेत. कोरोना महमारीच्या काळात अनेक कामगार बेरोजगार झाले आणि नाका कामगारांच्या हाताला काम नाही आणि शासनाकडे नाका कामगारांची नोंदणी सध्या नसल्याने कामगाराला कुठलेही वेतन मिळत नाही याबद्दल कामगारांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे याच आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रदीप कांबळे, सरचिटणीस गुणवंतराव नागटिळे यांनी घेतला आहे, असे अशोकभाऊ कांबळ यांनी सांगितले.

 728 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.