रात्री ११ नंतर बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

संचारबंदीच्या काळात बाहेर न पडण्याचे नागरिकांना केले आवाहन, विनामास्क फिरणाऱ्यांवर केली कारवाई

कल्याण : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील पोलिसांनी संचारबंदीच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजल्यानंतर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा रस्त्यावर उतरला. नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात देखील पोलिसांचा एक मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. नागरिकांना वाहनचालकांना संचारबंदी सुरू झाल्याने या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते. विना मास्क फिरणाऱ्यांवर देखील यावेळी पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवार यांनी दिली.

 537 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.