सर्वच स्तरांवर कुचकामी ठरलेय महाविकास आघाडी सरकार – अतुल भातखळकर

स्पर्धा घ्यायच्या असतील तर भजनांच्याही स्पर्धा घ्यावात भातखळकरांचा सेनेला टोला

ठाणे : मराठा आरक्षणाचा घातलेला गोंधळ, महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलेली अपुरी मदत, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार राज्यातील जनतेच्या नशिबी आले हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
ठाणे भाजपा आयोजित पत्रकार परिषदेत भातखळकर बोलत होते. यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अॅड, माधवी नाईक, प्रदेश सचिव अॅड. संदीप लेले, गटनेते संजय वाघुले आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून टाकला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू न मांडल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. या सरकारने आता मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. मराठा समाजाचे आरक्षण कायम रहावे ही या सरकारचीच इच्छा नाही. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतक:यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. परंतु आजही अनेक शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकलेली नाही. वाडा, पालघर येथील भात खरेदी केंद्र बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली हि मदत खूपच कमी आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिरायत शेतीसाठी २५ हजार आणि बागायती शेतीसाठी ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. फळबागांसाठी एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण आता सत्तेत असताना आपण काय मागणी केली होती याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. अजानच्या स्पर्धेवरुन सध्या सुरू असलेल्या राजकायावरही भातखळकर यांनी भाष्य केले. अजानच्या विरोधातील मुद्दा नाही, परंतु जी शिवसेना २०१४, २०१९ च्या आधी कॉंग्रेसला मत म्हणजे कसाबला मत, बागंलादेशींना इथुन बाहेर काढा असे बोलत होती. परंतु आता तीच शिवसेना अशा स्पर्धा घेत असल्याने आश्चर्य वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे स्पर्धा घ्यायच्या असतील तर भजनांच्याही स्पर्धा घ्यावात असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेत आज केवळ मतांसाठी बदल होत असून दाढय़ा कुरवळण्याचे हे प्रेम असल्याची टिकाही त्यांनी केली. एकूणच हिंदुत्वाला तिलांजली देण्याचे काम शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांनी केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोलिसांवर देखील अत्याचार वाढत आहे. नागपुरमधील घटनेत वाहतुक पोलीसाला बोनेटवर घेऊन प्रचंड वेगात चालविले. मंत्रलयात बदल्या बोल्या लावून केल्या जातात. मंत्री घरी बोलावून एखाद्याला मारहाण करतात, त्यामुळे कायद्याचे राज्य राहिलेले नाही. मनसे बरोबर जाणार का? असा सवाल त्यांना केला असता, भाजप सर्वच निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाभकास आघाडी एकत्र आली तरी भाजपचा ङोंडा फडकले असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उलट ते एकत्र येतात म्हणजे आमची ताकद वाढलेली आहे.
गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही. तीन मिहन्यांचा पगार न मिळाल्याने ३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर सरकारने एसटी कर्मचा:यांच्या वेतनासाठी पॅकेज जाहीर केले. सामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले पाठविली गेली आहेत. वीज बिल माफ करण्याचे आश्वासनही या सरकारने पाळले नाही. पत्रकार अर्णब गोस्वामी , अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर केलेल्या कारवाईने आघाडी सरकार सूडबुद्धीने काम करते आहे, हेच दिसले आहे. समाज माध्यमांमधून या सरकारविरोधात बोलणा:या लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. घरात बसून राज्यकारभार हाकणारा मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दु:ख , हालअपेष्टा जाणून घेऊ शकतच नाही. मुख्यमंत्र्यांच्या कटुंबियांच्या आर्थिक व्यवहाराबाबत आरोप होत आहेत मात्र मुख्यमंत्री काहीही बोलण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
बदल्यांचे मेनु कार्ड सध्या मंत्रलयात उपलब्ध आहे, मंत्रलयात बदल्यांसाठी अधिकृतरित्या बोली लावणेच आता शिल्लक आहे. त्यानुसारच या बदल्या कोणत्याही कारणाशिवाय केल्या जात आहेत. कोवीडच्या कालखंडात जीआर काढून बदल्या करु नये त्यासाठी देखील खर्च होत असतो. परंतु स्वत:च्या निर्णयाला धाब्यावर बसवून बदल्यांचा सपाटा लावला. नागपुरच्या मॅटने ठपका ठेवत त्या रद्दबातल केल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडीच्या चौकशीला सामोरे जावे
सरनाईक यांना ईडीची भिती वाटत असेल तर ज्या पध्दतीने अर्णव गोस्वामीनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, तसे त्यांना देखील अधिकार आहेत. न्यायलययाचे दरवाजे त्यांच्यासाठीही उघडे आहेत, त्यासाठी क्वॉरन्टाईन होण्याची गरज नाही. कर नाही त्याला डर कशाला. त्यांनी जावे ईडीच्या चौकशीला सामोरे. महाविकास आघाडीतील तीन पक्षाचे नेते ही भयभीत झालेले आहेत. ईडीच्या चौकशीमुळे राज्यसराकर पडू शकत नाही. परंतु आपले अपयश झाकण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहे. आधी सरकार चालवूनच दाखवा मग ते आम्ही पाडू अशी टिकाही त्यांनी केली. भ्रष्टाचाराने माखलेले हे सरकार असल्याची टिकाही त्यांनी केली.

 286 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.