कल्याण ग्रामीण मध्ये होणार आगरी-कोळी, वारकरी भवन – राजू पाटील

आगरी कोळी बोलीला राजाश्रय मिळवुन देण्यासाठी ठाण्यातील आगरी साहित्यिकांची आमदार राजु पाटील यांच्याकडे मागणी

कल्याण : ठाण्याची मुळ बोली आगरी-कोळी भाषा आणि तिचे साहित्य जतन-संवर्धनात पुढाकार घेत असलेले युवा साहित्यिक सर्वेश तरे, भुमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील,चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील,गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांना आगरी-कोळी बोलीला ‘राजाश्रय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी आवाहन आणि मागणी केली.
यावेळी आमदार राजु पाटील पाटील यांनी एकंदर महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आपण सोबत प्रयत्न करु असे सांगीतले. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांकडून आगरी भवन तसेच वारकरी संप्रदायाकडून वारकरी भवन उभारण्याची मागणी अनेक जण करत होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार कडून त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर सरकारी मदतीवर अवलंबून न राहता ते स्वखर्चाने खोणी येथे ‘आगरी-कोळी आणि वारकरी’ भवन बांधणार व येत्या १९ डिसेंबर रोजी भुमीपुजन करणार असल्याचे सांगितले.
येथे किर्तनकार व वारकऱ्यांसाठी रात्री राहण्यासाठी व्यवस्था असेल. भजन,प्रवचन,किर्तनकार व समाजातील कोणत्याही प्रकारच्या गायकांसाठी एक रेकॅार्डींग स्टुडिओ येथे असेल. तसेच आगरी व विविध बोली भाषेतील साहित्य व एक ग्रंथालय असेल अशी माहिती दिली.  तसेच १००% आगरी-कोळी बोली व तिचे साहित्य जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करु असे सांगितले. 

 287 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.