टोरंट कंपनीच्या वाढत्या बिलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

किमान पुढील तीन महीने बिल आकारणी करू नये, ग्राहकांवर विनाकारण गुन्हा दाखल न करण्याची भारतीय जनता पार्टीची मागणी

ठाणे : कळवा खारेगाव मुंब्रा आणी शिळ विभागाच्या वीजग्राहकांना टोरंट कंपनीने राज्य सरकारचे निर्देश असताना सरासरी बिल न आकरता लॉकडाउनच्या कालावधीत नागरिक आर्थिक अडचणीत असताना
सरसकट ( युनिट रेट च्या वाढत्या दराने)
किमान दोन हजार ते दहा हजार पर्यंत बिल आकारली आहेत. तसेच कळवा खारेगाव येथील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वाढीव बिल ह्या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारींची टोरंट कंपनीकडून दखल न घेतली जाणे,
असे निदर्शनास आल्यामुळे निरंजन डावखरे, आमदार, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा
यांनी राजेश नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे यांना तातडीने उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले , तसेच जिल्हाधिकारी साहेबांना किमान पुढील तीन महिने वीज बिलाची आकारणी सक्तीने करू नये अशी विनंती केली आहे व आपली वीज बिलाबाबत तक्रारीची बाजू मांडण्याकरता गेलेल्या ग्राहकावर विनाकारण गुन्हा दाखल करू नये अशी देखील मागणी केलेली आहे.
यापूर्वी देखील पंधरा दिवसापूर्वी माननीय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनादेखील तोरण च्या वाढत्या बिलाच्या तक्रारीबाबत निवेदन आमदार निरंजन डावखरे साहेब यांनी दिले होते.

या बैठकीत निवेदन देण्याकरता मनोहर सुगदरे
भारतीय जनता पार्टी सरचिटणीस, ठाणे शहर जिल्हा, आणि नागरिक प्रतिनिधी म्हणून खारेगाव येथील रहिवासी दीपक शिंदे तसेच कळवा प्रवासी संघ अध्यक्ष सिद्धेश देसाई उपस्थित होते.
या चर्चेअंती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी टोरंट पॉवर च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना दिलासा देणे बाबत आश्वासन दिले आहे.

 376 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.