डोंबिवली : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर, नाशिक बाल संस्कार व युअवा प्रबोधन विभाग यांच्या वतीने विश्वविक्रमी राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख गुरुमाऊली यांचे आशीर्वाद व बालसंस्कार युवा प्रबोधन विभाग प्रमुख नितीन भाऊ यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरविण्यात आला.राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील बाल संस्कार वर्गातील मुले व शाळांमधील विद्यार्थी यांच्या सहभागातून राज्यस्तरीय विज्ञान महोत्सव भरविण्यात आल्याचे बाल संस्कार प्रतिनिधी मनीषा छल्लारे यांनी सांगितले. आकर्षण आणि नाविन्य असे विषय या स्पर्धेसाठी निवडले होते.विज्ञानाचे महत्व,विज्ञानाची आवड निर्माण व्हावी,त्यातून विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती निर्माण करणे हा महोत्सवाचा उद्देश होता. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले वैज्ञानिक प्रयोग, विविध महत्वाची माहिती देणारे तक्ते, प्रोजेक्ट्स यांचा समावेश होता.बाल संस्कारचे प्रतिनिधी सुषमा सहस्त्रबुद्धे, दिवा जोशी आणि महेश कचरेकर यासह अनेकांनी महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत केली.
519 total views, 1 views today