तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर उतरणार

ठाण्यात मराठा समाजाचा सरकारला अल्टीमेटम

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेल्या स्थगितीला कारस्थानाचा वास येत असून कुचकामी ठरलेल्या आघाडीसरकारच्या विरोधात आज सकल मराठा समाजानं आक्रोश आणि संताप व्यक्त करीत वेळप्रसंगी करोनाचं संकट झुगारून रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला. ठाण्यात शासकिय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाभरातून मोठी गर्दी लोटली होती.
हे अपयश सरकारनं चार दिवसात निस्तरलं नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा अल्टीमेट देतानाच समाजानं सरकार, शिक्षण मंत्री आणि अधिष्ठाता कुंभकोणी यांचा धिक्कार केला. मागच्या वेळेस एक दिवसाच्या अधिवेशनाचा आग्रह धरणारे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हात कुणीही बांधलेले नाहीत. ते अधिवेशन आता त्यांनी घेतले नाही तर मात्र,मराठा समाज त्यांना माफ करणार नाही, असं मोर्चाचे समन्वयक कैलाश म्हापदी यांनी नमूद केलं.आपल्याला युक्तीवाद न करण्या विषयी फडणवीसांनी सांगितलं होतं, हा अधिष्ठाता कुंभकोणींचा खुलासा चार कोटी मराठयांशी बेईमान करणारा असल्याचा संताप समाजानं व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश बाहेर पडण्याआधीच महाराष्ट्र सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनी आरक्षित ऍडमीशन्स रद्द करण्याचा फतवा जाहिर केला. या वरून इतर समाजांच्या मनात मराठÎांविषयी किती पोटदुखी आहे हे दाखवून बैठकीत शिक्षणमंत्र्यांचाही निषेध केला गेला.
समाजानं लवकरचं मुंबईत २८८ आमदार आणि ४८ खासदारांची एकत्रीत बैठक घेऊन त्यांची मत जाणून घेऊन त्यांनाही आरक्षणाच्या केंद्रीय आदेशासाठी अल्टीमेट द्यावा, असा ठरावही या बैठकीत झाला. समन्वयक रमेश आंब्रे, कैलाश म्हापदी (प्रवक्ते), ऍड. संतोष सुर्यराव, अविनाश पवार तसेच कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी झाडून उपस्थित होते.

 321 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.