रस्त्यांची कामे सुरू नागरिकांमध्ये दिलासा

बदलापूर जवळील दहीवली ते भोज रस्त्याचे झाले डांबरीकरण

बदलापूर : अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अर्धवट राहिलेल्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची कामे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून प्राथमिक स्वरूपात कामे सुरूही झाली आहेत. बदलापूर जवळील दहीवली ते भोज हा रस्ता अतिशय निकृष्ट झाला होता. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आज सुरु झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बदलापूर जवळील दहिवली ते भोज या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली होती. पावसाळ्यामध्ये कुंडेश्वर हे पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण आहे. कुंडेश्वर येथे या मार्गावरूनच जावे लागते. हा रस्ता लवकर करणे आवश्यक होते. तांत्रिक मंजुरी मिळून काम सुरू होणार असतानाच कोरोनाची संचार बंदी सुरू झाली. ‘कोरोना’संकटामुळे गेले जवळपास महिन्याहून अधिक काळ ही कामे बंद होती. संबंधित कामे अशाच प्रकारे अर्धवट अवस्थेत खोळंबून राहिली तर पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होऊन नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हळूहळू का होईना अर्धवट राहिलेल्या रस्ते प्रकल्पांची कामे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रस्ते डांबरी करण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 576 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.