आमदार आणि शहराध्यक्ष निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी दिले निवेदन
ठाणे : पालघर जिल्ह्यात झालेल्या साधूंच्या हत्याकांडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर भाजपाच्या कार्यकर्त्यांची मागणी राज्य सरकारकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची जमावाने निर्घृण हत्या केली. या मॉब लिंचिंगच्या घटनेचा निषेध करण्याबरोबरच साधूंना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी. आता पोलिसांच्या साक्षीने झालेले हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केला जात असून, हत्याकांडावर पांघरूण घालण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा निषेध करीत आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती होती
516 total views, 1 views today