‘हे’ नामवंत खेळाडू ‘करोना’ विरुद्धच्या लढाईत करताहेत ‘पोलीस’ ड्युटी…

भारताला जिंकून दिलीत सुवर्णपदके आणि विश्वचषक

नवी दिल्ली : खेळाच्या मैदानावर देशाचा गौरव वाढविणारे काही भारतीय खेळाडू सध्या कोविड -१९ विरुद्धच्या लढाईत देशव्यापी बंदीच्या वेळी पोलिसांची कर्तव्य बजावत रस्त्यावर उतरून लोकांना आपल्या घरी राहण्याचे आवाहन करीत आहेत.विश्वचषक विजेत्या क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राजपाल सिंह, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बॉक्सर अखिल कुमार आणि एशियन गेम्सचा चॅम्पियन कबड्डीपटू अजय ठाकूर हे सर्व पूर्णवेळ पोलिस अधिकारी आहेत आणि खेळातील कामगिरीमुळे त्यांना ही नोकरी मिळाली आहे.
मोहालीमध्ये डीएसपी पदावर तैनात असलेले राजपाल म्हणाले, “मी पूर्णवेळ पोलिस काम करत आहे आणि सध्या लॉकडाऊनचे अनुसरण करणे हे मुख्य काम आहे. तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तू देण्यावर आमचा भर आहे.” यावेळी संयम ही सर्वात मोठी जबाबदारी आहे आम्ही लोकांना धीर देण्याचा आणि घरात राहण्याचे आव्हान करत आहोत की ,लवकरच यातून आपण सावरू.
टी – २० वर्ल्डकप २००७ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अंतिम षटकात चमत्कारीत गोलंदाजी करणारा जोगिंदर म्हणाला, मी २००७ पासून हरियाणा पोलिसात डीएसपी पदावर कार्यरत आहे.’यावेळी एक वेगळ्या प्रकारचे आव्हान आमच्या समोर आहे. आमची ड्युटी सकाळी सहा वाजल्यापासून लोकांना जागरूक करणे, बंदचे पालन करणे आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यासह सुरू होते.’२००६ कॉमनवेल्थ गेम्स मधील सुवर्णपदक विजेता अखिल कुमार गुरुग्राममध्ये एसीपी पदावर कार्यरत आहे. अखिल कुमार म्हणाले, “लोक सहकार्य करीत आहेत. आवश्यक मदत मिळविण्यापेक्षा लोक जास्त घाबरत आहेत. लॉकडाऊनचे काटेकोरपणे अनुसरण केल्यास हा विषाणूवर आपण मात करू शकतो. लोकही समजून घेत आहेत.
नुकताच आपला ३८ वा वाढदिवस साजरा करणारे कुमार आपल्या मित्रांसोबत जेवण गोळा करत आहेत आणि गरजूंना अन्न आणि सेनिटायझर्स देत आहेत. त्याचवेळी रेवाडीमध्ये तैनात आशियाई कांस्यपदक जिंकणारा जितेंद्र म्हणाला, “आम्ही आमचे प्रयत्न करीत आहोत. भूक काय असते हे आम्हला ठाऊक आहे”
अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री विजेता ठाकूर हिमाचल प्रदेश पोलिसात आहेत. बिलासपुरात पोस्ट केलेले जितेंद्र म्हणाले, “आम्ही मास्क, ग्लोव्हज आणि सेनेटिझर्स घेऊन फिरत आहोत, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांनी घरातच थांबायला पाहिजे.”खेळाडू म्हणून त्यांना सर्वांना संयमाचे महत्त्व माहित आहे आणि यामुळे त्यांना सद्य परिस्थितीशी सामना करण्यास मदत होत आहे. दोन वेळचे ऑलिम्पिक विजेता कुमार म्हणाले, ‘सेवा, सुरक्षा आणि सहकार्य हे आमच्या टीमचे सूत्र आहे. आम्ही संपूर्णत: या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करीत आहोत.’

 613 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.