साईराम मित्र मंडळाच्या वतीने ठाणे ते शिर्डी सायकलयात्रा

यंदाचे या सायकल यात्रेचे १६ वे वर्ष असून या सायकल यात्रेत १५० सायकलस्वार सहभागी झाले आहेत. सायकल यात्रेची सुरुवात परिसरातून पालखी मिरवणूक काढून करण्यात आली.

ठाणे: साईबाबांचा जयघोष करत ठाण्यातून शेकडो साईभक्त बुधवारी सायकलवरून शिर्डीकडे रवाना झाले.
ठाण्यातील नामदेवाडी ,पाचपाखाडी येथील साईराम मित्र मंडळाचा वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे ते शिर्डी सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे . पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिराच्या येथून या सायकल यात्रेला सुरुवात झाली यावेळी नगरसेवक नारायण पवार, प्रदीप दळवी,विलास हरपाल,अनिल तुपे,मंडळाचे  अध्यक्ष विनोद गुप्ता,उपाध्यक्ष विशाल घाडगे,सेक्रेटरी अजय सुखदरे,खजिनदार चंदन धनावडे, गणेश बनोटे,सुशांत रहाटे आदी सह मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. १९ ऑक्टोबर रोजी सुरु झालेली हि सायकल यात्रा २२ ऑक्टोबर  रोजी शिर्डी येथे पोहोचणार आहे.
दरवर्षी कोणत्याही प्रकारचा खंड न पडता अविरतपणे हि सायकल यात्रा आयोजित करण्यात येत असते . यंदाचे या सायकल यात्रेचे १६ वे वर्ष असून या सायकल यात्रेत १५० सायकलस्वार सहभागी झाले आहेत. सायकल यात्रेची सुरुवात परिसरातून पालखी मिरवणूक काढून करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व साईभक्त सहभागी झाले होते

 705 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.