मृत्यूदर वाढताच जिल्ह्यात १७८२ नवे रुग्ण; तर ७० रुग्णांचा मृत्यू

 ठाणे – ठाणे जिल्ह्यात गुरुवारी  रुग्ण संख्या कमी होऊन १७८२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ लाख ९६ हजार १०४ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ८ हजार ३११ झाली आहे.
 ठाणे शहर परिसरात ३३९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २५ हजार ५४९ झाली आहे. शहरात ९ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ७८३ झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत ५९५ रुग्णांची वाढ झाली असून २१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १९८ रुग्णांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ३५ रुग्ण सापडले असून १ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत २५ बाधीत असून ४ मृत्यूची नोंद आहे.  मीरा भाईंदरमध्ये २१६ रुग्ण आढळले १० जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ५२ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये  ८३ रुग्णांची नोंद झाली असून ७ च्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २३९ नवे रुग्ण वाढले आहेत. तर १० जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३१ हजार २४६ झाली असून आतापर्यंत ७७२ मृत्यूंची नोंद आहे.

 397 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.