जिल्ह्यात आज २७४४ नवे रुग्ण; तर ४२ रुग्णांचा मृत्यू

ठाणे – ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना रविवारीही काही प्रमाणात घट झाली. आज २७४४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ लाख ७२ हजार ७९४ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ हजार ६८५ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ७५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २० हजार ४०९ झाली आहे. शहरात ०८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ६८९ झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत आज ७२९ रुग्णांची वाढ झाली असून ०८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत आज ४२४ रुग्णांची वाढ झाली असून ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ७४ रुग्ण सापडले असून ०२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत २४ बाधीत असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये २६२ रुग्ण आढळले असून ०८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १०३ रुग्ण आढळले असून ०८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १४९ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २२३ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०२ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २७ हजार ००५ झाली असून आतापर्यंत ६९६ मृत्यूंची नोंद आहे.

 424 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.