बारवी धरणातील नवी मुंबई पालिकेचा कोटा कमी केल्यास आंदोलन

औद्योगिक विभागातील समस्या तातडीने मार्गी लावा

ठाणे बेलापूर मार्ग सिग्नलविरहीत करण्यास एमएमआरडीएचा प्रतिसाद

जैव विविधता क्षेत्रात स्थानिकांचे पारंपारिक अधिकार कायम ठेवा

नागरी सुविधा भुखंड एमआयडीसीने नमुंमपाला तात्काळ विनामुल्य हस्तांतरित करावेत

आमदार गणेश नाईक यांची एआयडीसी आणि पालिकेकडे मागणी

नवी मुंबई : एमआयडीसी मंडळातील अनेक अधिकारी चांगले काम करीत आहेत परंतु काही अधिकारी स्वतःच्या आणि ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी नवी मुंबईच्या सार्वजनिक सुविधांमध्ये बाधा आणत असून अशा प्रवृत्तींना लोकशाहीच्या चौकटीत जाब विचारण्यात येईल, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. एमआयडीसी भागातील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार नाईक यांनी मंगळवारी एमआयडीसीच्या महापे येथील विभागीय कार्यालयास भेट दिली. विभागीय अधिकारी सतिष बागल यांच्याकडे औद्योगिक परिसरातील समस्या स्पष्ट मांडल्या. झोपडपटयांमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत याकडे लक्ष वेधत पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. झोपडपटयांचा एसआरएच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी केली. हा विकास स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातूनच करावा
अनेकवेळा काही अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या भल्यासाठी सार्वजनिक वाहतुकीस किंवा इतर जन सुविधेस अडथळा ठरेल, अषाप्रकारे संगणमताने भुखंडांचे प्लाॅटिंग करतात. हे थांबायला हवं असे स्पष्ट करतं एमआयडीसीकडून मिळणारे नागरी सुविधा भुखंड नवी मुंबई महापालिका बगिचे, रिक्षा स्टॅन्ड, स्वच्छतागृहे इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगात आणते. त्यामुळे सुविधा भुखंडांचे हस्तांतरण एमआयडीसीने पालिकेला विनामुल्य करावे, अषी मागणी त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोकरी रोजगार उपलब्ध करून देण्याची सुचना त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत केली.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना महिन्यातून एकदा आमदार नाईक भेटणार असून केलेल्या मागण्यांवर किती कार्यवाही झाली याचा पाठपुरावा नियमितपणे करणार आहेत.
प्रामुख्याने औद्योगिक भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने बारवी धरण बांधले. हे धरण एका महापालिकेला देण्याचे घाटत आहे. असे आमदार नाईक यांनी सांगितले. बारवी धरणातून नवी मुंबई महापालिकेच्या वाटयाचा पाणीकोटा कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देखील आमदार नाईक यांनी दिला. एमआयडीसी भागात अनेक ट्रक आणि केमिकलसह इतर माल वाहतुक करणारे टॅंकर षेकडोच्या संख्येने येत असतात. ते कुठेही थांबत असल्याने वाहतुककोंडी होत असते. यावर उपाय म्हणून एमआयडीसीने या वाहनांसाठी स्वतंत्र टार्मिलन बांधावेत.एमआयडीसीकडे असलेले भुखंड वाणिज्यिक वापरासाठी न ठेवता लोक सुविधांसाठी त्यांचा वापर करावा, अशी सुचना आमदार गणेश नाईक यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केली. नाईक यांनी मांडलेल्या समस्यांवर निश्चितच तोडगा काढू, असे आश्वासन विभागीय अधिकारी बागल यांनी दिले आहे.
एमएमआरडीएच्या निर्माणाधिन ऐरोली काटई या उडडाणपूलाच्या कामाची देखील आमदार नाईक यांनी पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता प्रकाश भांगरे तांत्रिक सल्लागार आकार अभिनवचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना प्रकल्पाच्या प्रगतीबददल सविस्तर माहिती दिली. मुंबईतून नवी मुंबईमार्गे कल्याण-डोंबिवलीकडे जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी हा मार्ग उपयुक्त असल्याचे मत नाईक यांनी नोंदवले. आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात माजी आमदार संदीप नाईक यांनी या मार्गावर नवी मुंबईसाठी चढणे आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याची महत्वाची सुचना केली होती. त्यानुसार ही सोय एमएमआरडीएने केल्याची माहिती अधिक्षक अभियंता भांगरे यांनी दिली. ठाणे बेलापूर मार्गावरील प्रवास अधिक गतीमान व्हावा यासाठी आमदार नाईक यांनी हा मार्ग सिग्लनविरहित करण्याची संकल्पना मांडली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या मार्गावर दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वीचा ठाणे ते वाशी हा तासभराचा प्रवास आता २० ते २५ मिनिटांवर आला आहे. हा प्रवास अधिक गतीमान आणि सुरक्षित करण्यासाठी हा मार्ग सिग्लनविरहीत करण्याची सुचना नाईक यांनी केली असता त्यास एमएमआरडीएचे तांत्रिक सल्लागार आकार अभिनव तसेच अधिक्षक अभियंता भांगरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ऐरोली दिवा गाव येथील जैवविविधता केंद्राला देखील नाईक यांनी भेट देवून हे पर्यटन स्थळ अधिक विकसीत करण्यासाठी काय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत याचा आढावा त्यांनी घेतला या ठिकाणी असलेल्या जेटटीची पाहणी केली. या ठिकाणी स्थानिक कोळी, आगरी, बांधवांचा पारंपारिक वहिवाटीचा अधिकार, दषक्रीया संबधीचे विधीचा अधिकार इत्यादींवर रोख आणता कामा नये, अशी भुमिका त्यांनी कांदळवन अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यास वन अधिकाऱ्यांनी होकार दर्शविला.
ऐरोलीतील होल्डिंग पाॅन्डमधे उडडाणपूलाच्या खांबासाठी भराव टाकल्याची तक्रार स्थानिक माजी नगरसेवक अशोक पाटील आणि पर्यावरण प्रेमींनी नाईक यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता पर्यावरण खात्याने या कामासाठी ठेकेदाराला परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र पिलरचे काम पूर्ण झाल्यावर हा भराव काढण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. पिलरचे काम झाल्यावर हा भराव काढून टाकण्यात येईल, होल्डिंग पाॅन्डची साफसफाई करण्यात येईल, याबाबतचे लेखी आश्वासन देण्याची सुचना नाईक यांनी केली असता अधिकाऱ्यांनी ती मान्य केली.
मंगळवारच्या दौऱ्यात आमदार नाईक यांच्या समवेत माजी खासदार डाॅ संजीव नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक अंनत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक चद्रंकांत पाटील, माजी नगरसेवक नविन गवते, माजी नगरसेवक राम आशिष यादव माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी नगरसेवक अमित मेढकर, समाजसेवक विकास झंजाड समाजसेवक सुरेश पाल गणेश मेढकर आदींनी एमआयडीसी संबंधात आपल्या प्रभागांतील समस्या आमदार नाईक यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमोर मांडल्या

 326 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.