कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी जिल्हा परिषदेने राबवला उपक्रम
ठाणे : जिल्हा परिषदे मार्फत जिल्हाच्या ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.आज कल्याण तालुक्यातील काही गावांमध्ये आमदार किसन कथोरे यांनी स्वतः घरोघरी जाऊन गोळ्यांचे वाटप केले. दरम्यान त्यांनी काही गावामध्ये वृक्षारोपण केले.
त्यांनी दहागाव, रायते,गोवेली, म्हसकळ, घोटासई या गावाना भेटी देऊन अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी पंचायत समिती सभापती अनिता वाघचौरे, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा मगर, सासे, पंचायत समिती सदस्य यशवंत दळवी, रेश्मा भोईर, गावाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, कल्याण पंचायत समिती गट विकास अधिकारी श्वेता पालवे, इतर अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक घरात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य , गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग दर्शवत आहेत.
451 total views, 1 views today